नागपूर ,दि.१८डिसें२००८ , आज मा.आ.रणजितसिंह मोहिते-पाटील मोहिते-पाटील यांनी राज्यातील विविध प्रश्न उपस्थित केले.
१.कापुस एकाधिकार योजनेच्या तत्कालीन नियमानुसार राज्यातील शेतक-यांना शासनास प्राप्त झालेला नफा बोनस रूपाने वाटण्याबाबत ऱणजितसिंहांनी प्रश्न विचारला की, सन २००५-०६व २००६-०७ या दोन्ही आर्थिक वर्षात पणन महासंघाने खरेदी केलेल्या कापसाच्या विक्रीतून २५० कोटी रू फायदा पणन महासंघाने शेतक-यांना २००८ मध्येही आजपर्यंत वाटप का केला नाही व किती कालावधित शासन हा नफा वाटप करणार आहे , या प्रश्नाला उत्तर देताना पणन मंत्री ना.मदन पाटील यांनी विधान परिषदेमध्ये सांगितले की, सदर प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यात येईल व शेतक-यांना नफा वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करू.
२. विधी मंडळाच्या सन २००८ मधिल हिवाळी अधिवेशना मध्ये सादर केलेल्या पुरवणी मागण्यांच्या चर्चेमध्ये भाग घेउन आ.रणजितसिंहांनी नगरविकास विभागाकडे सोलापूर मनपा साठी हद्दवाढ भागामध्ये नागरी सोई-सुविधा पुरविण्यासाठी १७२ कोटी रू. विकास निधी द्यावा. केंद्र शासनाच्या लघु व मध्यम शहरांच्या विकास योजनेतून निधी मिळण्याबाबत प्रस्ताव पाठवून २ वर्ष झाले, निधी मंजूरीचे पत्र मनपाला मिळाले परंतू निधी मात्र अद्यापही मिळाला नाही,म्हणून शासनाने पुढाकार घेऊन स्वताच्या हिश्श्याचा निधी द्यावा व केंद्र शासनाकडूनही निधी मिळवून द्यावा तरच सोलापूरच्या हद्दवाढ भागात नागरी सुविधा देणे शक्य होईल, यावर नगरविकास मंत्री व मुख्यमंत्र्यांनी राज्य शासनाचा निधी देऊन केंद्राचा निधी मिळवून देण्यासाठी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment