नागपूर. १९ डिसेंबर . आज मा.रणजितदादा शासकीय विमानाने मुंबईला रवाना झाले, मग आमदार निवास रूम नं ३०४ मध्ये आलो,मग सुरू झाली चिंतनाची बैठक.विचार हे जीवंतपणाचे लक्षण व आयुष्याचा वेग व आवेग याबद्दल मनात काहूर माजते. मित्रांची संगत मला घडवित असल्याचा भास होतो. संपर्कात येणारा प्रत्येक जण माझा शिक्षक असतो व मी विद्यार्थी...
नेहमी राजमार्गाने प्रवास करावा,कारण राजमार्गावर वाटमारी होत नाही.
सततची सावधानता हीच खरी सुरक्षितता. असे विचार आबा कदम या मित्राचे .
आई नेहमी म्हणते, समाजाच्या शाळेत पदवी घेतली तरच तु खरा पदवीधर, अन्यथा तूझी इंजीनिअरींगची कागदी पदवी कवडीमोल आहे. जीवनाचा प्रवास हा शिक्षण व प्रशिक्षणाचा आहे. २६,२७,२८ नोव्हे च्या अतिरेकी हल्ल्यानंतर राजकीय युध्द झाले, अतिरेकीपणाने बोलणारे हरले ( अंगात क्षमता असूनही ) या प्रसंगातून नेहमी विवेकपूर्ण बोलावे हे शिकलो. मौन हेच मोठे शस्त्र आहे,याचा प्रत्यय आला.नेहमी आनंदी रहावे व संतूलित असावे. नियंत्रीत भावना हेच आयूष्याच्या यशाचे गमक आहे,याचा पावलोपावली जाणवते. काल लोकसत्तामध्ये लेख वाचला.सुंदर विवेचन, काही महत्वपूर्ण ओळी मित्रांसाठी लिहीत आहे........एखाद्या विषयाची पूर्ण माहीती होत नाही तोपर्यंत त्या विषयावर बोलण्याचे व प्रतिक्रीया देण्याचे कटाक्षाने टाळावे.इतरांशी संपर्क साधून विचारांची देवाणघेवाण करणे,चर्चा करणे,सुसंवाद साधने यामुळे आपल्या विचारांच्या कक्षा व्यापक होतात.एक महत्वाचे - तुमचे विचार जसे तुम्हाला प्रिय आहेत,अगदी तसेच इतरांना देखिल त्यांचे विचार प्रिय असतात,म्हणून त्यांचाही नेहमी आदर करा.याचा अर्थ वैचारीक मतभेद असू नयेत,असे नव्हे तर वाद टाळून संवाद निर्माण करण्याची कला अवगत करा. प्रत्येक संवाद हा संवादच राहिला पाहिजे. विचारांचा सामना विचारांनीच करायला शिकणे हा जीवनाचा पहिला धडा.
समाज व जीवन नेहमी बदलत राहणार.रोज एक नवीन प्रश्न व रोज एक नवीन संघर्ष.एका प्रश्नाचे उत्तर सापडले की दुसरा प्रश्न उभा.प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे असणारच. .....जगाला प्रकाश देण्यासाठी वातीला जळावेच लागते,नव्हे ते तिचे कामच आहे, ते काम तिने स्वखुशीने स्वीकारले आहे.तुम्हीच ठरवा की,तुम्हाला दिव्याची वात होउन जगाला प्रकाश द्यायचा की,दिव्याखालचा अंधार.निर्णय तुमचा आहे. माझा निर्णय प्रकाश देण्याचा. चला प्रकाशाचे वाटेकरू होउ, परिवर्तनाचे अंगबनून डोळे मिटण्याआधी परिवर्तन घडवूया.हल्ली मला शुक्राची चांदणी फार चमकताना दिसते, परिवर्तनासाठी व समृध्दीची नांदी आहे,याची खात्रीच आहे. ...फिर मिलेंगे...मिलते रहेंगे...परिवर्तन का अंग बनेंगे,और परिवर्तन करेंगे...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment